मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

१९६५ युद्ध - हिंदुस्थानचा विजय. पाकिस्तान खच्ची.

हिंदुस्थान आणि युद्धे म्हटलं की दोन युद्धे लगेच आठवतात , रामायण आणि महाभारत! त्यानंतर आठवतात ती नेहरूंच्या बावळटपणामुळे आणि अहंकारामुळे चीन कडून सपाटून मार खाललेले १९६२ चे युद्ध आणि पाकिस्तानचा माज उतरवून त्याचे सरळ दोन भाग केलेले १९७१ चे बांगलादेश मुक्ती युद्ध.   पण या दरम्यान एक अतिशय नाजूक आणि महत्वाचे युद्ध झाले होते , अर्थात पाकिस्तानबरोबरच. या युद्धाने हिंदुस्थानला यश दिले , आत्मविश्वास दिला आणि भविष्याकडे वाटचाल करण्याची निश्चित दिशा दाखवली. आणि ते युद्ध आहे १९६५ चे हिंदुस्थान - पाकिस्तान युद्ध! हिंदूंची हत्या करून ,  हिंदूंना बंदुकीच्या आणि हिंसेच्या दहशतीखाली काश्मीर सोडायला लावलेले काश्मीर आपले आहे असा बालबुद्धीचा समाज कायमच पाकड्यांनी केला आहे. याच बालहट्टापायी १९४७ चे काश्मीर मुक्ती छोटेखानी युद्ध झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती म्हणजे १९६५. आपल्याला चीन कडून हार पत्करून जेमतेम तीन वर्षे झाली होती. १९४७ पासून शांततेची डोळ्यावर झापड होती ते डोळे खाडकन उघडले गेले होते. सेनेची पुनर्रचना चालू होती , अमेरिकेकडून पाकिस्तानला अत्याधुनिक शस्त्रे पुरवली जात होती आणि यातच ह...
अलीकडील पोस्ट

गाणाऱ्याचे पोर

पुस्तक: गाणाऱ्याचे पोर लेखक: राघवेंद्र भीमसेन जोशी पाने: १८७ पंडित भीमसेन जोशींचे स्वर्गीय स्वर ज्याने कधी ऐकले असतील तर ते विसरणे केवळ अशक्य! अशा व्यक्तीच्या मुलानेच जर आपल्या वडिलांबद्दल पुस्तक लिहिले तर जवळच्या व्यक्तीला ज्या गोष्टी, जे कंगोरे जे क्षण माहिती असतील ते इतर कोणाला कळणे शक्य नाही. म्हणूनच मला पुस्तक आवर्जून वाचावेसे वाटले. वाटले की भीमसेन जोशींच्या सवयी, आवड- निवड,रियाज, गाण्यामागचे रहस्य, शिकण्याचा काळ वगैरे वगैरे गोष्टी कळतील. पण पुस्तक वाचायला लागलो आणि एक गोष्ट लक्षात यायला लागली की हे पुस्तक पंडित भीमसेन जोशींबद्दल मुळात नाहीच आहे. त्यांच्या मुलाने आपले गऱ्हाणे, आपली दुःखे, आपल्यावर झालेला अन्याय या गोष्टी जगासमोर आणण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे. पंडित भीमसेन जोशी हे कलाकार म्हणून अतुलनीय असतील पण स्वतः च्या आयुष्यात त्यांनी चुका केल्या व त्यांचा पाढा म्हणजे हे पुस्तकं आहे. वास्तविक राघवेंद्र जोशी हे एक नावाजलेले 'पानाड्या' होते, म्हणजे जमिनीत पाणी कोठे लागेल हे ते अचूकपणे सांगत. संरक्षण विभागातले सुरक्षित नोकरी सोडून पूर्णवेळ वैराण, प्रसंगी खडकाळ पाणी शो...

Why don’t you fly? Backdoor to Beijing by Bicycle

पुस्तक :   Why don’t you fly? - Backdoor to Beijing by Bicycle लेखक : क्रिस्तोफर स्मिथ पाने: २७४ माझ्यामते प्रवासवर्णन लिहिणे ही एक अतिशय अवघड गोष्ट आहे. कारण प्रवास जेवढा रोमहर्षक असतो त्या तोडीचे लिखाण घडत नाही जे तिर्हाईताला वाचावेसे वाटेल, गुंतवून ठेवेल. आणि त्यात परत सायकल प्रवासवर्णन असेल तर आणखीनच अवघड कारण लहानपणी जे सायकलशी नाते तुटलेले असते ते आयुष्यभर तसेच राहते. आणि म्हणूनच इंग्लंड ते चायना या सायकल प्रवासाचे वर्णन करणारे हे पुस्तक मला फार आवडले. (तसे मीही डोंबिवली ते कोकणात हर्णे आणि परत असे ५०० कि. सायकलिंग केले आहे) पुस्तक आवडले कारण क्रिसोफरने प्रवासाचा खिस न काढता अतिशय ओघवत्या रीतीने लिहिले आहे. जसा त्याचा प्रवास पुढे सरकत जातो तसेच पुस्तकही आपसूक पुढे पुढे सरकत जाते, मध्ये कोठे अडकत नाही, अडखळत नाही. कंटाळवाणेही होत नाही. इंग्लंड मधून सुरु करून त्याने युरोप पार केले, मग इराण मध्ये शिरला, तेथील वाळवंट आणि कठोर परिसर पार करत अफगाणिस्तानच्या डोंगर दऱ्यातून पाकिस्तानमध्ये गेला. तेथे दहशतीने ग्रासलेल्या बलुचिस्तान प्रांतातून तो हिंदुस्तानात आला, आणि अमृतसर ते कन्याकुम...

उंबरठा

  'उंबरठा' व्यंकटेश माडगूळकर पाने: १४६ व्यंकटेश माडगूळकर म्हटलं की ग्रामीण जीवन आणि जंगल या दोन्हींचे सुरेल मिश्रण गृहीत धरायचं. उंबरठा त्याला अपवाद नाही. रोमान्स पण ग्रामीण, उपेक्षित पण ग्रामीण, पाटलाची दांडगाई ती पण ग्रामीण आणि मध्येच जंगलात उडी. नुसती उडीच नाही तर थरकाप. कोणी जर ५ मिनिटे ही जंगलात वाट हरविण्याचा अनुभव घेतला असेल तर जाणवेल की निबीड अरण्यात जिथे जंगली अजस्त्र गवे वास्तव्य करतात अशा जंगलात जखमी गव्याच्या मागावर असताना जाणकार माणूसच रस्ता चुकला आणि खोल खोल जात राहिला आणि अचानक लक्षात आलं की आपण तर गव्यांच्या जाण्यायेण्याच्या वाटेत उभे आहोत, तर! अशा रोमहर्षक कथांच्या मधोमध असताना आपण उंबरठा ओलांडून व्यंकटेश माडगूळकरांच्या ग्रामीण जीवनात आणि घनदाट जंगलात कधी पाऊल टाकतो आणि समरस होऊन जातो ते लक्षात ही येत नाही. आणखी काय सांगावे. स्वतः वाचून अनुभव घ्यावे धवल रामतीर्थकर सीवुडस, नवी मुंबई

द ग्रेट गेम १९१७ - मध्यपूर्वेची रक्तलांच्छित शताब्दी

  द ग्रेट गेम १९१७ - मध्यपूर्वेची रक्तलांच्छित शताब्दी लेखक - जयराज साळगावकर प्रकाशन - परम मित्र आता परिचय लिहीत आहे म्हणजे प्रत्येक परिचय चांगलाच असणार, म्हणजे पुस्तकाला चांगलं म्हणलेलाच असणार असं नाही. काही पुस्तके मनापासून आवडतात, भावतात, आपण त्यात स्वतः ला विसरून जातो, तर कधी कधी आपण अशी पुस्तके खूप अपेक्षेने निवडतो व वाचताना जाणवते की अरेच्चा दुसरे पुस्तक घेतले असते तर बरं झालं असतं. द ग्रेट गेम हे असंच दुसऱ्या श्रेणीतले पुस्तक वाटले. खरं तर विषय अत्यंत उत्कंठावर्धक आहे. मध्यपूर्वेचा इतिहास! पण सुरुवातीला प्रस्तावना वाचताना याची कुणकुण लागते कारण प्रस्तावना लिहिणाऱ्या प्रसिद्ध इतिहास लेखकाने नमूद केले आहे की यात थोडी गडबड झाली आहे. इतिहासात अत्यंत महत्वाचे काही असते तर ते काळाप्रमाणे मांडणी करणे. ते जर व्यवस्थित नसेल तर इतिहासच गडबडून जातो. त्यात परत लेखक इतक्या खोलात गेले आहेत, प्रत्येक माणसाचे नाव, छोट्या छोट्या दैनंदिन घटना व अशा गोष्टींमुळे सलग 'link' अशी कधी लागलीच नाही व मध्यर्वेचा पूर्ण इतिहासही कळाला नाही. रियासतकार गोविंद सरदेसाई, किंवा वि.स.वाळिंबे यांसारखी इ...

जंगलाचं देणं

  पुस्तक: जंगलाचं देणं लेखक: मारुती चितमपल्ली पाने: १३५ प्रकाशन: साहित्य प्रसार केंद्र, नागपूर पुरस्कार: महाराष्ट्र राज्य साहित्यिक पुरस्कार (१९८९), विदर्भ साहित्य संघ पुरस्कार (१९९१) आता मारुती चितमपल्ली म्हटलं की जंगल, आणि जंगल म्हटलं की मारुती चितमपल्ली हे समीकरण पक्कं झालं आहे. म्हणतात त्यांना पक्षीतज्ज्ञ, पण आहेत ते जंगलतज्ज्ञ. त्यात परत नवेगावची इंच इंच भूमी, एक एक पण, छोट्याला छोटा खडा, तळे, पक्षी, प्राणी आणि आदिवासीही त्यांच्या परिचयाची. त्याव्यतिरिक्त ते ज्या ज्या ठिकाणी (म्हणजेच जंगलात) रुजू होत, ती ती भूमी (जंगल) पालथे घालत. यातूनच साकार झाले आहे 'जंगलाचं देणं' एकाहून एक जंगलाशी समरस होऊन जाऊ अशा जंगलातल्या कथा, प्राण्याविषयी, पक्ष्यांविषयी, डोहांविषयी, आदिवासींविषयी, पाटीलांविषयी. आपल्यासारख्ये शहरी जीवनात अडकलेल्यांनी कधी कल्पना ही काली नसेल असे अनुभव. एकूण भन्नाट २७ अनुभवांमधील दोन अनुभव मला खास भावले. पहिले 'टेकराज'. आजकाल वारूळे नामशेष झालीत असे वाटत. हीच वारुळे जेव्हा खणली जातात तेव्हा खाली एक अद्भुत जग असते. या वाळवीच्या जगात सगळे कसे साचेबद्ध असते, ...

पडघवली

  'पडघवली' लेखक - गो नी दांडेकर पाने- २२२ प्रकाशन- मौज - आज बाई सारवा, उद्या बाई तारवा - इवलं हातावर हागल्याशिवाय डोळ्यात फुंकरसुद्धा घालायची नाही - माकड गेलं लुटी नि आणल्या दोन मुठी - फाशांचा डाव नि दैवाचा घाव - पायावर पाणी घाल म्हटलं, तर तोरड्या किती तोळ्याच्या... - भित्री भागुबई, चुलीशी बसुबाई - पोरीत पोरगा लोंबडा... - फट म्हणता सन्याशी मरायचा! - नागव्यांच्या गावी पितांबारची पेठ - आपलं घर नि शेणाने भर कोकण म्हटलं की सगळंच निराळं. कोकणचे पाणी असो, माणसं असो किंवा त्यांची शिवराळ वाटणारी भाषा. पुस्तकातील वरील काही कोकणी म्हणींवरून त्याचा प्रत्यय आला असेलच. पण कोकणाची खरी ओळख करून घ्यायची असेल तर 'पडघवली' वाचावे. पडघवली हे एक पुस्तक नाही तर काही वर्षांपूर्वीच्या कोकणाचे चलचित्र आहे. एक एक पान म्हणजे एक एक सीन वाटतो. सुरुवात शिवाजी महाराजांच्या काळातील कोकणात होते. कसे अंजनवेलीच्या किल्लेदाराकडे कारकून असलेल्या केशवभटांनी स्वतः चे रक्त सांडून सिद्दी च्या मुसलमानी चाच्यांची खोड मोडून कोकणातील गणपतीपुळे, गुहागर, अंजनवेल असा परिसर हिंदूंसाठी सुरक्षित केला. बक्षीस म्हणून ...

मॅन हंट

  पुस्तक: मॅन हंट लेखक: पीटर बर्गन अनुवाद: रवी आमले पाने: २२८ ९/११, ट्विन टॉवर आणि बिन लादेन हे समीकरण कायमचे लक्षात राहणारे. आता यात आणखी एक पक्ष म्हणजे अमेरिका. आणि चुकांचा, खोटेपणाचा इतिहास लाभलेल्या या देशाने सांगितलेल्या गोष्टीत किती तथ्य आणि किती मिथ्य आहे हे सांगणे कठीण. विशेष करून जेव्हा आपण हे सत्य जाणतो की कसे अमेरिकाने खोटी नाटी कारणे सांगून इराक सारख्या अरब देशाची वाट लावली आणि तेथून पुढे मध्य आशियात अशाच खोट्या कारवाया करून अशांतता पसरवली आणि लाखो लोकांचा जीव घेतला. असो, तर ही आहे बिन लादेनच्या शोधाची थोडीफार थरारक कथा. कथा सुरु होते लादेनने अमेरिकेसारख्या सुपरपॉवर ची शान असलेले ट्वीन तोवर बेचिराख केल्याच्या घटनेनंतर. स्वाभिमान ही अतिशय नाजूक गोष्ट असते. आणि देशाचा स्वाभिमान म्हणजे नाजूक तसेच अतिशय दबाव आणणारी गोष्ट. त्यालाच जर का ठेच लागली तर अमेरिकेसारखा बलाढ्य, घमंडखोर देश आकाश-पाताळ एक करून ठेच लागलेल्या कारणाला समाप्त केल्याशिवाय राहणार नाही हे उघडच. अतोनात पैसे आणि अमेरिकेची गोरी माणसे खर्चून ही मोहीम सुरु होते अफगाणिस्तानमध्ये.आपल्या प्रगत तंत्रज्ञानाच्या आणि...

शिवछत्रपतींचे आरमार

पुस्तक : शिवछत्रपतींचे आरमार लेखक : गजानन भास्कर मेहेंदळे / संतोष प्र शिंत्रे पाने : १७७   आज जो महाराष्ट्र आहे तो शिवाजी महाराजांमुळे, त्यांच्या दूरदृष्टीमुळे, माणसे पारखण्याच्या आणि जोडण्याच्या कसबेमुळे. त्यांच्या अनेक लढाया गनिमी काव्याची अप्रतिम उदाहरणे आहेत. आणि अशा थोर व्यक्तीच्या कर्तबगारीविषयी, हुशारीविषयी आणि धोरणाविषयी कोणी लिहावे तर मेहेंदळे यांसारख्या इतिहासाच्या मुळापासून अभ्यास केलेल्या इतिहासकाराने. अशा या दोन अफलातून मिश्रणातून तयार झाले आहे ते हे पुस्तक. A diorama showing Maratha naval tactics, on display at the National Museum, New Delhi. | Nomu420 / CC BY-SA 3.0 १५वे - १६वे शतक हा असा काळ होता जेव्हा युरोपिअन सत्ता म्हणजे पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आणि काही प्रमाणात अरब यांचे सागरावर स्वामित्व होते. हिंद महासागरात काही वेगळीपरीस्थिती नव्हती. तेव्हा तर कोकणही स्वराज्यात नव्हते, आदिलशाही आणि नंतर निजामशाहीत होते. अशा कठीण काळात शिवाजी महाराजांनी प्रथम कोकण मुक्त केले. याने काय झाले तर काही किनारे स्वराज्यात आले. यानंतर त्यांनी आपले आरमार उभे करण्यास सुरुवात क...

आतंक (कथा संग्रह)

पुस्तक: आतंक (कथा संग्रह) लेखक: विलास सारंग पाने:२२५ माझा दृष्टिकोन आत्यंतिक नाकारात्म, निराशावादी आणि अमानुषीकरणात्म आहे असे काहींना वाटेल. जीवनमूल्यविषयक भ्रमांना (इल्युजन्सना) फार थारा न देण्याचा माझा प्रयत्न असतो, इतकेच यावर म्हणता येईल.  मराठी लेखन कारण्यामधली मोठी समस्या म्हणजे मध्यमवर्गीय, 'घरगुती' संस्कृतीच्या प्रभावापासून आपला आत्मा वाचविण्याची. आधुनिकतावादी वृत्तीने जीवनाचा वेध घेऊ पाहणाऱ्या लेखकाला मध्यमवर्गीय संवेदनांवृत्तीपासून ('सेन्सिबिलिटी' पासून) स्वतःचा बचाव करणे भाग पडते. कौटुंबिकता, 'सात्विकता', स्थिरता अशा मूल्यांना चिकटून राहणारी, मर्यादित परिघात सुरक्षित राहू पाहणारी, वेगळ्या नव्या विचारांकडे, मूल्यांच्या शोधाकडे संशयाने पाहणारी मध्यमवर्गीय संवेदनावृत्ती खऱ्या कलात्मक गांभीर्याला पोषक नसते. खेळकर घरगुतीपणा हा मराठी भाषाशैलीचा स्थायीभाव होऊन बसलेला आहे. हे आहे विलास सारंग यांचे मत आणि त्यांच्या लिखाणामागचा विचार जो त्यांनी पुस्तकाच्या शेवटी मांडला आहे.  विलास सारंग यांच्या या कथासंग्रहतील प्रत्येक कथा याच विचारसरणीतून साकारली गेली आहे. ...

आवरण

मूळ लेखक: एस एल भैरप्पा अनुवाद: उमा कुलकर्णी भैरप्पा यांची दोन पुस्तके मी याआधी वाचली आहेत. 'मंद्र' ही संगीत विषय आणि मानवी संबंध गुंतवून आपल्याला गुंतवून ठेवणारी कादंबरी आकस्मितपणे वाचणे झाले. आणि 'पर्व' हा महाभारताचा अद्भुत रीतीने उलघडलेला पट मागून मागून मी वाचला आणि महाभारतातील प्रत्येक पात्राची नव्याने ओळख झाली. 'आवरण' भैरप्पांचं अजून एक विस्मयकारी असे पुस्तक आहे. 'आवरण' आजच वाचून पूर्ण झाले आणि भैरप्पांनि अजून एका अफलातून पुस्तकाद्वारे माझ्या विचारसरणीत आणि ज्ञानात अमूल्य भर घातल्याची जाणीव झाली. धार्मिक जिहाद, लव्ह जिहाद आणि मोदीपर्व पूर्वी असलेली 'सेक्युलर' परिस्थिती याच काळात लिहिली गेलेली आणि 'सेक्युलरिसम' याची ऐतिहासिक पुराव्यांसकट चिरफाड करणारी इतिहासावरील ऐतिहासिक कादंबरी आहे असे म्हणू शकतो. भैरप्पांची वैचारिक पातळी जेवढ्या उच्च प्रतीची आहे, तेवढ्याच उच्च प्रतीचा अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केल्यामुळे आवरण नक्की वाचावी अशी कादंबरी झाली आहे. यात वेगळं काहीच नाही म्हणा, त्यांची पुस्तके एकदा वाचण्यास सुरुवात केली की संपेपर्यंत सतत...