मुख्य सामग्रीवर वगळा

Why don’t you fly? Backdoor to Beijing by Bicycle

पुस्तक: Why don’t you fly? -Backdoor to Beijing by Bicycle
लेखक: क्रिस्तोफर स्मिथ
पाने: २७४

माझ्यामते प्रवासवर्णन लिहिणे ही एक अतिशय अवघड गोष्ट आहे. कारण प्रवास जेवढा रोमहर्षक असतो त्या तोडीचे लिखाण घडत नाही जे तिर्हाईताला वाचावेसे वाटेल, गुंतवून ठेवेल. आणि त्यात परत सायकल प्रवासवर्णन असेल तर आणखीनच अवघड कारण लहानपणी जे सायकलशी नाते तुटलेले असते ते आयुष्यभर तसेच राहते. आणि म्हणूनच इंग्लंड ते चायना या सायकल प्रवासाचे वर्णन करणारे हे पुस्तक मला फार आवडले. (तसे मीही डोंबिवली ते कोकणात हर्णे आणि परत असे ५०० कि. सायकलिंग केले आहे)
पुस्तक आवडले कारण क्रिसोफरने प्रवासाचा खिस न काढता अतिशय ओघवत्या रीतीने लिहिले आहे. जसा त्याचा प्रवास पुढे सरकत जातो तसेच पुस्तकही आपसूक पुढे पुढे सरकत जाते, मध्ये कोठे अडकत नाही, अडखळत नाही. कंटाळवाणेही होत नाही. इंग्लंड मधून सुरु करून त्याने युरोप पार केले, मग इराण मध्ये शिरला, तेथील वाळवंट आणि कठोर परिसर पार करत अफगाणिस्तानच्या डोंगर दऱ्यातून पाकिस्तानमध्ये गेला. तेथे दहशतीने ग्रासलेल्या बलुचिस्तान प्रांतातून तो हिंदुस्तानात आला, आणि अमृतसर ते कन्याकुमारी आणि परत कलकत्ता वरून अमृतसर असे हिंदुस्थान भ्रमण करून तो वागाह बॉर्डर वरून परत पाकिस्तान मार्गे चायना मध्ये दोन पाय आणि दोन चाके घेऊन गेला.
शेवटी रशिया मधल्या सायबेरिया येथे जायची इच्छा असूनही रशियाने व्हिसा न दिल्याकारणाने त्याला आपला प्रवास बीजिंग मध्ये संपवावा लागला. पण हा हजारो किलोमीटरचा सायकल प्रवास मनोरंजक किस्स्यांनी, विविध देशातील चालीरीत्यांनी, असंख्य अनुभवांनी आणि ६-७ वेळा सायकलवरून पडून अविस्मरणीय बनला आहे.
काही देशांमध्ये त्याने अनुभवलेले ठळक मुद्दे:
जर्मनी- अतिशय काटेकोरपणे नियम पाळणारे लोक. सायकलसाठी अतिशय कमी रस्ते आणि चुकून गाड्यांच्या रस्त्यावर सायकल गेली तर ताबडतोब दंड.
इराण- उत्तम रस्ते पण अत्यंत रखरखीत प्रदेश. तिथे बायका म्हणजे काळे कापड एवढेच. पण सामान्य पुरुष अत्यंत चांगले व मदत करणारे.
अफगाणिस्तान- बायका कुठे दिसतच नाहीत. जिकडे तिकडे पुरुष आणि उंच उंच डोंगर.
पाकिस्तान- गरीब प्रदेश, पण लोक मदत करणारे. बलुचिस्तान हा अत्यंत धोकादायक प्रदेश पण डोंगरांनी नटलेला.
हिंदुस्थान- प्रचंड आकार असलेला देश. रस्त्यावर शिस्त नावाचा प्रकारच गायब. पण जेवढे प्रेम, आपुलकी, सुंदर स्रीया आणि सुरक्षा हिंदुस्तानमध्ये आहे ती इतर कोणत्या देशात अनुभवली नाही.
चीन- अपेक्षापेक्षा एकदम निराळा, सरळ सपाट माणसांनी भरलेला प्रदेश नसून हिरव्यागार डोंगरांनी भरलेला देश. स्रीया वागायला एकदम मोकळ्या. लोक चांगले पण राजकारणी वाईट.
अशा अनेक देशातून आपल्याला हे पुस्तक किलोमीटर किलोमीटरने घेऊन जाते आणि शेवटी परत युरोप मधल्या एकसंध, कंटाळवाण्या जीवनात नेऊन सोडते. हे पुस्तक आकाराने मोठे आहे, त्यातील अक्षरे तुलनेने छोटी आहेत, म्हणजेच २७४ पाने असली तरी ३५० पानांऐवढा मजकूर सहज असणार. पण सुरुवात केली की शेवटपर्यंत वाचावेसे वाटणारे पुस्तके आहे यात शंकाच नाही.

क्रिस्तोफरच्या सायकल सफारीचे फोटो येथे पाहू शकता:
www.cycleuktochina.com

धवल रामतीर्थकर
(सीवूड्स, नवी मुंबई)
आणि आता पुढचे वाचन सुरू... गाणाऱ्याचे पोर


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द ग्रेट गेम १९१७ - मध्यपूर्वेची रक्तलांच्छित शताब्दी

  द ग्रेट गेम १९१७ - मध्यपूर्वेची रक्तलांच्छित शताब्दी लेखक - जयराज साळगावकर प्रकाशन - परम मित्र आता परिचय लिहीत आहे म्हणजे प्रत्येक परिचय चांगलाच असणार, म्हणजे पुस्तकाला चांगलं म्हणलेलाच असणार असं नाही. काही पुस्तके मनापासून आवडतात, भावतात, आपण त्यात स्वतः ला विसरून जातो, तर कधी कधी आपण अशी पुस्तके खूप अपेक्षेने निवडतो व वाचताना जाणवते की अरेच्चा दुसरे पुस्तक घेतले असते तर बरं झालं असतं. द ग्रेट गेम हे असंच दुसऱ्या श्रेणीतले पुस्तक वाटले. खरं तर विषय अत्यंत उत्कंठावर्धक आहे. मध्यपूर्वेचा इतिहास! पण सुरुवातीला प्रस्तावना वाचताना याची कुणकुण लागते कारण प्रस्तावना लिहिणाऱ्या प्रसिद्ध इतिहास लेखकाने नमूद केले आहे की यात थोडी गडबड झाली आहे. इतिहासात अत्यंत महत्वाचे काही असते तर ते काळाप्रमाणे मांडणी करणे. ते जर व्यवस्थित नसेल तर इतिहासच गडबडून जातो. त्यात परत लेखक इतक्या खोलात गेले आहेत, प्रत्येक माणसाचे नाव, छोट्या छोट्या दैनंदिन घटना व अशा गोष्टींमुळे सलग 'link' अशी कधी लागलीच नाही व मध्यर्वेचा पूर्ण इतिहासही कळाला नाही. रियासतकार गोविंद सरदेसाई, किंवा वि.स.वाळिंबे यांसारखी इ...

शिवछत्रपतींचे आरमार

पुस्तक : शिवछत्रपतींचे आरमार लेखक : गजानन भास्कर मेहेंदळे / संतोष प्र शिंत्रे पाने : १७७   आज जो महाराष्ट्र आहे तो शिवाजी महाराजांमुळे, त्यांच्या दूरदृष्टीमुळे, माणसे पारखण्याच्या आणि जोडण्याच्या कसबेमुळे. त्यांच्या अनेक लढाया गनिमी काव्याची अप्रतिम उदाहरणे आहेत. आणि अशा थोर व्यक्तीच्या कर्तबगारीविषयी, हुशारीविषयी आणि धोरणाविषयी कोणी लिहावे तर मेहेंदळे यांसारख्या इतिहासाच्या मुळापासून अभ्यास केलेल्या इतिहासकाराने. अशा या दोन अफलातून मिश्रणातून तयार झाले आहे ते हे पुस्तक. A diorama showing Maratha naval tactics, on display at the National Museum, New Delhi. | Nomu420 / CC BY-SA 3.0 १५वे - १६वे शतक हा असा काळ होता जेव्हा युरोपिअन सत्ता म्हणजे पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आणि काही प्रमाणात अरब यांचे सागरावर स्वामित्व होते. हिंद महासागरात काही वेगळीपरीस्थिती नव्हती. तेव्हा तर कोकणही स्वराज्यात नव्हते, आदिलशाही आणि नंतर निजामशाहीत होते. अशा कठीण काळात शिवाजी महाराजांनी प्रथम कोकण मुक्त केले. याने काय झाले तर काही किनारे स्वराज्यात आले. यानंतर त्यांनी आपले आरमार उभे करण्यास सुरुवात क...

पडघवली

  'पडघवली' लेखक - गो नी दांडेकर पाने- २२२ प्रकाशन- मौज - आज बाई सारवा, उद्या बाई तारवा - इवलं हातावर हागल्याशिवाय डोळ्यात फुंकरसुद्धा घालायची नाही - माकड गेलं लुटी नि आणल्या दोन मुठी - फाशांचा डाव नि दैवाचा घाव - पायावर पाणी घाल म्हटलं, तर तोरड्या किती तोळ्याच्या... - भित्री भागुबई, चुलीशी बसुबाई - पोरीत पोरगा लोंबडा... - फट म्हणता सन्याशी मरायचा! - नागव्यांच्या गावी पितांबारची पेठ - आपलं घर नि शेणाने भर कोकण म्हटलं की सगळंच निराळं. कोकणचे पाणी असो, माणसं असो किंवा त्यांची शिवराळ वाटणारी भाषा. पुस्तकातील वरील काही कोकणी म्हणींवरून त्याचा प्रत्यय आला असेलच. पण कोकणाची खरी ओळख करून घ्यायची असेल तर 'पडघवली' वाचावे. पडघवली हे एक पुस्तक नाही तर काही वर्षांपूर्वीच्या कोकणाचे चलचित्र आहे. एक एक पान म्हणजे एक एक सीन वाटतो. सुरुवात शिवाजी महाराजांच्या काळातील कोकणात होते. कसे अंजनवेलीच्या किल्लेदाराकडे कारकून असलेल्या केशवभटांनी स्वतः चे रक्त सांडून सिद्दी च्या मुसलमानी चाच्यांची खोड मोडून कोकणातील गणपतीपुळे, गुहागर, अंजनवेल असा परिसर हिंदूंसाठी सुरक्षित केला. बक्षीस म्हणून ...