मुख्य सामग्रीवर वगळा

१९६५ युद्ध - हिंदुस्थानचा विजय. पाकिस्तान खच्ची.

हिंदुस्थान आणि युद्धे म्हटलं की दोन युद्धे लगेच आठवतात, रामायण आणि महाभारत! त्यानंतर आठवतात ती नेहरूंच्या बावळटपणामुळे आणि अहंकारामुळे चीन कडून सपाटून मार खाललेले १९६२ चे युद्ध आणि पाकिस्तानचा माज उतरवून त्याचे सरळ दोन भाग केलेले १९७१ चे बांगलादेश मुक्ती युद्ध. 

पण या दरम्यान एक अतिशय नाजूक आणि महत्वाचे युद्ध झाले होते, अर्थात पाकिस्तानबरोबरच. या युद्धाने हिंदुस्थानला यश दिले, आत्मविश्वास दिला आणि भविष्याकडे वाटचाल करण्याची निश्चित दिशा दाखवली. आणि ते युद्ध आहे १९६५ चे हिंदुस्थान - पाकिस्तान युद्ध!

हिंदूंची हत्या करूनहिंदूंना बंदुकीच्या आणि हिंसेच्या दहशतीखाली काश्मीर सोडायला लावलेले काश्मीर आपले आहे असा बालबुद्धीचा समाज कायमच पाकड्यांनी केला आहे. याच बालहट्टापायी १९४७ चे काश्मीर मुक्ती छोटेखानी युद्ध झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती म्हणजे १९६५. आपल्याला चीन कडून हार पत्करून जेमतेम तीन वर्षे झाली होती. १९४७ पासून शांततेची डोळ्यावर झापड होती ते डोळे खाडकन उघडले गेले होते. सेनेची पुनर्रचना चालू होती, अमेरिकेकडून पाकिस्तानला अत्याधुनिक शस्त्रे पुरवली जात होती आणि यातच हिंदुस्थान द्वेषी भुट्टो घराणे पाकिस्तान चालवू लागले. त्यांच्या हट्टापायी सेनाध्यक्ष अयुब खान याने मुजाहिद आणि पाकिस्तान सेनेचे जवान असे मिश्रण काश्मीर मध्ये घुसवायचा आणि काश्मीरी लोकांना बरोबर घेऊन हिंदुस्तानविरुद्ध बंड करून काश्मीर वेगळा करायचा असा बेत रचला. आणि सुरु झाले पाकिस्तान आणि हिंदुस्थान या दोन्ही देशांना नको असलेलं युद्ध!

या युद्धाची काही ठळक वैशिष्ट्ये होती आणि त्यामुळे भविष्यात काय बदल घडले ते बघूया:

१. अमेरिकेने पाकिस्तानला पुरवलेले अत्याधुनिक पॅटन रणगाडे आणि F-८६ विमाने याच्या जोरावर पाकिस्तानने हिंदुस्तानाशी दोन हात कराचे साहस केले. पण खेम करण च्या युद्धात आणि इतर ठिकाणी हिंदुस्थानच्या चिलखती दलाने पॅटनचा रणगाड्यांचा धुव्वा उडवला आणि तब्बल ४५० पॅटन उध्वस्त केले.

२. हिंदुस्थानने हे युद्ध जिंकल्यामुळे आणि पाकिस्तान कमकुवत झाल्यामुळे ईस्ट पाकिस्तान ला हुरूप चढला आणि यातूनच पुढे १९७१ मध्ये त्यांनी  उठाव केला आणि पाकिस्तान विभागून बांगलादेश निर्माण झाला.

३. सेनेकडे अनेक वर्ष दुर्लक्ष केल्यामुळे पाहिजे तसे यश हिंदुस्थानाला मिळू शकले नाही. मनोबल कमी होते, गुप्तचर विभाग कमकुवत होता यामुळे पाकिस्तानला सपशेल पराभूत करून कायमचे नेस्तनाबूत शक्य होते पण झाले नाही.

असे हे किचकट युद्ध अत्यंत तन्मयतेने आणि अभ्यासपूर्ण वृत्तीने पत्रकार आणि संरक्षण समीक्षक नितीन गोखले यांनी आपल्यासमोर आणले आहे. यात जवळपास सर्वच पुस्तकांमध्ये असलेली मूळभूत त्रुटी म्हणजे वेळोवेळी नकाशे न देणे. पण जोमेची बाजू अशी की आपल्याला १९६५ मध्ये मुख्य काय घडत होते ते स्पष्टपणे डोळ्यासमोर उभे राहते. आणि तीच या  पुस्तकाची जोमेची बाजू आहे. उत्कृष्ट, मुद्देसूद मांडणी आहे. थोडे तांत्रिक असले तरी उत्कंठा कायम राहते. १९६५ चा हिंदुस्थान विजय लोकांसमोर आणल्याबद्दल नितीन गोखले यांचे अभिनंदन!

#वाचनवेडा
धवल रामतीर्थकर
सीवूड्स, नवी मुंबई








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द ग्रेट गेम १९१७ - मध्यपूर्वेची रक्तलांच्छित शताब्दी

  द ग्रेट गेम १९१७ - मध्यपूर्वेची रक्तलांच्छित शताब्दी लेखक - जयराज साळगावकर प्रकाशन - परम मित्र आता परिचय लिहीत आहे म्हणजे प्रत्येक परिचय चांगलाच असणार, म्हणजे पुस्तकाला चांगलं म्हणलेलाच असणार असं नाही. काही पुस्तके मनापासून आवडतात, भावतात, आपण त्यात स्वतः ला विसरून जातो, तर कधी कधी आपण अशी पुस्तके खूप अपेक्षेने निवडतो व वाचताना जाणवते की अरेच्चा दुसरे पुस्तक घेतले असते तर बरं झालं असतं. द ग्रेट गेम हे असंच दुसऱ्या श्रेणीतले पुस्तक वाटले. खरं तर विषय अत्यंत उत्कंठावर्धक आहे. मध्यपूर्वेचा इतिहास! पण सुरुवातीला प्रस्तावना वाचताना याची कुणकुण लागते कारण प्रस्तावना लिहिणाऱ्या प्रसिद्ध इतिहास लेखकाने नमूद केले आहे की यात थोडी गडबड झाली आहे. इतिहासात अत्यंत महत्वाचे काही असते तर ते काळाप्रमाणे मांडणी करणे. ते जर व्यवस्थित नसेल तर इतिहासच गडबडून जातो. त्यात परत लेखक इतक्या खोलात गेले आहेत, प्रत्येक माणसाचे नाव, छोट्या छोट्या दैनंदिन घटना व अशा गोष्टींमुळे सलग 'link' अशी कधी लागलीच नाही व मध्यर्वेचा पूर्ण इतिहासही कळाला नाही. रियासतकार गोविंद सरदेसाई, किंवा वि.स.वाळिंबे यांसारखी इ...

शिवछत्रपतींचे आरमार

पुस्तक : शिवछत्रपतींचे आरमार लेखक : गजानन भास्कर मेहेंदळे / संतोष प्र शिंत्रे पाने : १७७   आज जो महाराष्ट्र आहे तो शिवाजी महाराजांमुळे, त्यांच्या दूरदृष्टीमुळे, माणसे पारखण्याच्या आणि जोडण्याच्या कसबेमुळे. त्यांच्या अनेक लढाया गनिमी काव्याची अप्रतिम उदाहरणे आहेत. आणि अशा थोर व्यक्तीच्या कर्तबगारीविषयी, हुशारीविषयी आणि धोरणाविषयी कोणी लिहावे तर मेहेंदळे यांसारख्या इतिहासाच्या मुळापासून अभ्यास केलेल्या इतिहासकाराने. अशा या दोन अफलातून मिश्रणातून तयार झाले आहे ते हे पुस्तक. A diorama showing Maratha naval tactics, on display at the National Museum, New Delhi. | Nomu420 / CC BY-SA 3.0 १५वे - १६वे शतक हा असा काळ होता जेव्हा युरोपिअन सत्ता म्हणजे पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आणि काही प्रमाणात अरब यांचे सागरावर स्वामित्व होते. हिंद महासागरात काही वेगळीपरीस्थिती नव्हती. तेव्हा तर कोकणही स्वराज्यात नव्हते, आदिलशाही आणि नंतर निजामशाहीत होते. अशा कठीण काळात शिवाजी महाराजांनी प्रथम कोकण मुक्त केले. याने काय झाले तर काही किनारे स्वराज्यात आले. यानंतर त्यांनी आपले आरमार उभे करण्यास सुरुवात क...

पडघवली

  'पडघवली' लेखक - गो नी दांडेकर पाने- २२२ प्रकाशन- मौज - आज बाई सारवा, उद्या बाई तारवा - इवलं हातावर हागल्याशिवाय डोळ्यात फुंकरसुद्धा घालायची नाही - माकड गेलं लुटी नि आणल्या दोन मुठी - फाशांचा डाव नि दैवाचा घाव - पायावर पाणी घाल म्हटलं, तर तोरड्या किती तोळ्याच्या... - भित्री भागुबई, चुलीशी बसुबाई - पोरीत पोरगा लोंबडा... - फट म्हणता सन्याशी मरायचा! - नागव्यांच्या गावी पितांबारची पेठ - आपलं घर नि शेणाने भर कोकण म्हटलं की सगळंच निराळं. कोकणचे पाणी असो, माणसं असो किंवा त्यांची शिवराळ वाटणारी भाषा. पुस्तकातील वरील काही कोकणी म्हणींवरून त्याचा प्रत्यय आला असेलच. पण कोकणाची खरी ओळख करून घ्यायची असेल तर 'पडघवली' वाचावे. पडघवली हे एक पुस्तक नाही तर काही वर्षांपूर्वीच्या कोकणाचे चलचित्र आहे. एक एक पान म्हणजे एक एक सीन वाटतो. सुरुवात शिवाजी महाराजांच्या काळातील कोकणात होते. कसे अंजनवेलीच्या किल्लेदाराकडे कारकून असलेल्या केशवभटांनी स्वतः चे रक्त सांडून सिद्दी च्या मुसलमानी चाच्यांची खोड मोडून कोकणातील गणपतीपुळे, गुहागर, अंजनवेल असा परिसर हिंदूंसाठी सुरक्षित केला. बक्षीस म्हणून ...