हिंदुस्थान आणि युद्धे म्हटलं की दोन युद्धे लगेच आठवतात , रामायण आणि महाभारत! त्यानंतर आठवतात ती नेहरूंच्या बावळटपणामुळे आणि अहंकारामुळे चीन कडून सपाटून मार खाललेले १९६२ चे युद्ध आणि पाकिस्तानचा माज उतरवून त्याचे सरळ दोन भाग केलेले १९७१ चे बांगलादेश मुक्ती युद्ध. पण या दरम्यान एक अतिशय नाजूक आणि महत्वाचे युद्ध झाले होते , अर्थात पाकिस्तानबरोबरच. या युद्धाने हिंदुस्थानला यश दिले , आत्मविश्वास दिला आणि भविष्याकडे वाटचाल करण्याची निश्चित दिशा दाखवली. आणि ते युद्ध आहे १९६५ चे हिंदुस्थान - पाकिस्तान युद्ध! हिंदूंची हत्या करून , हिंदूंना बंदुकीच्या आणि हिंसेच्या दहशतीखाली काश्मीर सोडायला लावलेले काश्मीर आपले आहे असा बालबुद्धीचा समाज कायमच पाकड्यांनी केला आहे. याच बालहट्टापायी १९४७ चे काश्मीर मुक्ती छोटेखानी युद्ध झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती म्हणजे १९६५. आपल्याला चीन कडून हार पत्करून जेमतेम तीन वर्षे झाली होती. १९४७ पासून शांततेची डोळ्यावर झापड होती ते डोळे खाडकन उघडले गेले होते. सेनेची पुनर्रचना चालू होती , अमेरिकेकडून पाकिस्तानला अत्याधुनिक शस्त्रे पुरवली जात होती आणि यातच ह...