मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिवछत्रपतींचे आरमार

पुस्तक : शिवछत्रपतींचे आरमार लेखक : गजानन भास्कर मेहेंदळे / संतोष प्र शिंत्रे पाने : १७७   आज जो महाराष्ट्र आहे तो शिवाजी महाराजांमुळे, त्यांच्या दूरदृष्टीमुळे, माणसे पारखण्याच्या आणि जोडण्याच्या कसबेमुळे. त्यांच्या अनेक लढाया गनिमी काव्याची अप्रतिम उदाहरणे आहेत. आणि अशा थोर व्यक्तीच्या कर्तबगारीविषयी, हुशारीविषयी आणि धोरणाविषयी कोणी लिहावे तर मेहेंदळे यांसारख्या इतिहासाच्या मुळापासून अभ्यास केलेल्या इतिहासकाराने. अशा या दोन अफलातून मिश्रणातून तयार झाले आहे ते हे पुस्तक. A diorama showing Maratha naval tactics, on display at the National Museum, New Delhi. | Nomu420 / CC BY-SA 3.0 १५वे - १६वे शतक हा असा काळ होता जेव्हा युरोपिअन सत्ता म्हणजे पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आणि काही प्रमाणात अरब यांचे सागरावर स्वामित्व होते. हिंद महासागरात काही वेगळीपरीस्थिती नव्हती. तेव्हा तर कोकणही स्वराज्यात नव्हते, आदिलशाही आणि नंतर निजामशाहीत होते. अशा कठीण काळात शिवाजी महाराजांनी प्रथम कोकण मुक्त केले. याने काय झाले तर काही किनारे स्वराज्यात आले. यानंतर त्यांनी आपले आरमार उभे करण्यास सुरुवात क...

आतंक (कथा संग्रह)

पुस्तक: आतंक (कथा संग्रह) लेखक: विलास सारंग पाने:२२५ माझा दृष्टिकोन आत्यंतिक नाकारात्म, निराशावादी आणि अमानुषीकरणात्म आहे असे काहींना वाटेल. जीवनमूल्यविषयक भ्रमांना (इल्युजन्सना) फार थारा न देण्याचा माझा प्रयत्न असतो, इतकेच यावर म्हणता येईल.  मराठी लेखन कारण्यामधली मोठी समस्या म्हणजे मध्यमवर्गीय, 'घरगुती' संस्कृतीच्या प्रभावापासून आपला आत्मा वाचविण्याची. आधुनिकतावादी वृत्तीने जीवनाचा वेध घेऊ पाहणाऱ्या लेखकाला मध्यमवर्गीय संवेदनांवृत्तीपासून ('सेन्सिबिलिटी' पासून) स्वतःचा बचाव करणे भाग पडते. कौटुंबिकता, 'सात्विकता', स्थिरता अशा मूल्यांना चिकटून राहणारी, मर्यादित परिघात सुरक्षित राहू पाहणारी, वेगळ्या नव्या विचारांकडे, मूल्यांच्या शोधाकडे संशयाने पाहणारी मध्यमवर्गीय संवेदनावृत्ती खऱ्या कलात्मक गांभीर्याला पोषक नसते. खेळकर घरगुतीपणा हा मराठी भाषाशैलीचा स्थायीभाव होऊन बसलेला आहे. हे आहे विलास सारंग यांचे मत आणि त्यांच्या लिखाणामागचा विचार जो त्यांनी पुस्तकाच्या शेवटी मांडला आहे.  विलास सारंग यांच्या या कथासंग्रहतील प्रत्येक कथा याच विचारसरणीतून साकारली गेली आहे. ...

आवरण

मूळ लेखक: एस एल भैरप्पा अनुवाद: उमा कुलकर्णी भैरप्पा यांची दोन पुस्तके मी याआधी वाचली आहेत. 'मंद्र' ही संगीत विषय आणि मानवी संबंध गुंतवून आपल्याला गुंतवून ठेवणारी कादंबरी आकस्मितपणे वाचणे झाले. आणि 'पर्व' हा महाभारताचा अद्भुत रीतीने उलघडलेला पट मागून मागून मी वाचला आणि महाभारतातील प्रत्येक पात्राची नव्याने ओळख झाली. 'आवरण' भैरप्पांचं अजून एक विस्मयकारी असे पुस्तक आहे. 'आवरण' आजच वाचून पूर्ण झाले आणि भैरप्पांनि अजून एका अफलातून पुस्तकाद्वारे माझ्या विचारसरणीत आणि ज्ञानात अमूल्य भर घातल्याची जाणीव झाली. धार्मिक जिहाद, लव्ह जिहाद आणि मोदीपर्व पूर्वी असलेली 'सेक्युलर' परिस्थिती याच काळात लिहिली गेलेली आणि 'सेक्युलरिसम' याची ऐतिहासिक पुराव्यांसकट चिरफाड करणारी इतिहासावरील ऐतिहासिक कादंबरी आहे असे म्हणू शकतो. भैरप्पांची वैचारिक पातळी जेवढ्या उच्च प्रतीची आहे, तेवढ्याच उच्च प्रतीचा अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केल्यामुळे आवरण नक्की वाचावी अशी कादंबरी झाली आहे. यात वेगळं काहीच नाही म्हणा, त्यांची पुस्तके एकदा वाचण्यास सुरुवात केली की संपेपर्यंत सतत...