'उंबरठा' व्यंकटेश माडगूळकर पाने: १४६
व्यंकटेश माडगूळकर म्हटलं की ग्रामीण जीवन आणि जंगल या दोन्हींचे सुरेल मिश्रण गृहीत धरायचं. उंबरठा त्याला अपवाद नाही. रोमान्स पण ग्रामीण, उपेक्षित पण ग्रामीण, पाटलाची दांडगाई ती पण ग्रामीण आणि मध्येच जंगलात उडी. नुसती उडीच नाही तर थरकाप.
कोणी जर ५ मिनिटे ही जंगलात वाट हरविण्याचा अनुभव घेतला असेल तर जाणवेल की निबीड अरण्यात जिथे जंगली अजस्त्र गवे वास्तव्य करतात अशा जंगलात जखमी गव्याच्या मागावर असताना जाणकार माणूसच रस्ता चुकला आणि खोल खोल जात राहिला आणि अचानक लक्षात आलं की आपण तर गव्यांच्या जाण्यायेण्याच्या वाटेत उभे आहोत, तर!
अशा रोमहर्षक कथांच्या मधोमध असताना आपण उंबरठा ओलांडून व्यंकटेश माडगूळकरांच्या ग्रामीण जीवनात आणि घनदाट जंगलात कधी पाऊल टाकतो आणि समरस होऊन जातो ते लक्षात ही येत नाही.
आणखी काय सांगावे. स्वतः वाचून अनुभव घ्यावे
धवल रामतीर्थकर
सीवुडस, नवी मुंबई


टिप्पण्या