मुख्य सामग्रीवर वगळा

आतंक (कथा संग्रह)


पुस्तक: आतंक (कथा संग्रह)

लेखक: विलास सारंग

पाने:२२५



माझा दृष्टिकोन आत्यंतिक नाकारात्म, निराशावादी आणि अमानुषीकरणात्म आहे असे काहींना वाटेल. जीवनमूल्यविषयक भ्रमांना (इल्युजन्सना) फार थारा न देण्याचा माझा प्रयत्न असतो, इतकेच यावर म्हणता येईल. 

मराठी लेखन कारण्यामधली मोठी समस्या म्हणजे मध्यमवर्गीय, 'घरगुती' संस्कृतीच्या प्रभावापासून आपला आत्मा वाचविण्याची. आधुनिकतावादी वृत्तीने जीवनाचा वेध घेऊ पाहणाऱ्या लेखकाला मध्यमवर्गीय संवेदनांवृत्तीपासून ('सेन्सिबिलिटी' पासून) स्वतःचा बचाव करणे भाग पडते. कौटुंबिकता, 'सात्विकता', स्थिरता अशा मूल्यांना चिकटून राहणारी, मर्यादित परिघात सुरक्षित राहू पाहणारी, वेगळ्या नव्या विचारांकडे, मूल्यांच्या शोधाकडे संशयाने पाहणारी मध्यमवर्गीय संवेदनावृत्ती खऱ्या कलात्मक गांभीर्याला पोषक नसते. खेळकर घरगुतीपणा हा मराठी भाषाशैलीचा स्थायीभाव होऊन बसलेला आहे.

हे आहे विलास सारंग यांचे मत आणि त्यांच्या लिखाणामागचा विचार जो त्यांनी पुस्तकाच्या शेवटी मांडला आहे. 

विलास सारंग यांच्या या कथासंग्रहतील प्रत्येक कथा याच विचारसरणीतून साकारली गेली आहे. 'सुखकर्ता सुखकर्ता' मधील विसर्जन मिरवणुकीत अचानक आसनावरून उठून पळून जाणारे गणपती, 'मरणवृक्ष' मधील बुवांच्या चित्रामधून धूप जळत राहणे आणि त्याने अख्खे शहर धुपीच्या थरांखाली गाडलेले राहणे, 'कुर्मा -पुलाव' मधील खोल दलदल ज्यात पाय ठेवताच त्यात बुडून जाणे किंवा 'गर्भवती' मध्ये एका शिल्पकाराला मनासारखे गर्भवतीचे शिल्प साकारता न आल्यामुळे तो दरवाजा दुरुस्तीचे काम हाती घेतो आणि रात्री तोच दरवाजा चालत येऊन त्याच्या गर्भवती पत्नीचा जीव घेतो! 

कोणतीही कथा सरळ, एका रेषेत कधीच पुढे सरकत नाही. गम्मत अशी की एक कथा वाचताना यात काहीच होत नाही आहे असे वाटत असतानाच अचानक कथा असे काही वळण घेते की त्याची आपण कल्पनाही केली नसेल. अजून एक वैशिष्ट्य असे की कोणत्याही कथेला एक निश्चित शेवट नाही. ती अधांतरी संपते. पुढे काय होणार त्याचे चित्र वाचकाने आपापल्या कल्पनांच्या कुवतेप्रमाणे रंगवायचे, किंवा तिथेच सोडून द्यायचे. 

एका वेगळ्या धाटणीचे पुस्तक आहे असे निश्चित म्हणू शकतो. यातील कथांमध्ये रहस्य आहे, गूढता आहे, वासना आहे पण बीभत्सपणा नाही, आणि न चुकता प्रत्येक गोष्टीत एक अनपेक्षित वळण आहे, किंवा विषयच अनपेक्षित आहे. मला विलास सारंग हे लेखक परवापर्यंत माहीत नव्हतं. पण त्यांचे पुस्तक वाचल्यानंतर यातल्या कथा दीर्घ काळ लक्षात राहीतील हे नक्की!

धवल रामतीर्थकर
नवी मुंबई






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द ग्रेट गेम १९१७ - मध्यपूर्वेची रक्तलांच्छित शताब्दी

  द ग्रेट गेम १९१७ - मध्यपूर्वेची रक्तलांच्छित शताब्दी लेखक - जयराज साळगावकर प्रकाशन - परम मित्र आता परिचय लिहीत आहे म्हणजे प्रत्येक परिचय चांगलाच असणार, म्हणजे पुस्तकाला चांगलं म्हणलेलाच असणार असं नाही. काही पुस्तके मनापासून आवडतात, भावतात, आपण त्यात स्वतः ला विसरून जातो, तर कधी कधी आपण अशी पुस्तके खूप अपेक्षेने निवडतो व वाचताना जाणवते की अरेच्चा दुसरे पुस्तक घेतले असते तर बरं झालं असतं. द ग्रेट गेम हे असंच दुसऱ्या श्रेणीतले पुस्तक वाटले. खरं तर विषय अत्यंत उत्कंठावर्धक आहे. मध्यपूर्वेचा इतिहास! पण सुरुवातीला प्रस्तावना वाचताना याची कुणकुण लागते कारण प्रस्तावना लिहिणाऱ्या प्रसिद्ध इतिहास लेखकाने नमूद केले आहे की यात थोडी गडबड झाली आहे. इतिहासात अत्यंत महत्वाचे काही असते तर ते काळाप्रमाणे मांडणी करणे. ते जर व्यवस्थित नसेल तर इतिहासच गडबडून जातो. त्यात परत लेखक इतक्या खोलात गेले आहेत, प्रत्येक माणसाचे नाव, छोट्या छोट्या दैनंदिन घटना व अशा गोष्टींमुळे सलग 'link' अशी कधी लागलीच नाही व मध्यर्वेचा पूर्ण इतिहासही कळाला नाही. रियासतकार गोविंद सरदेसाई, किंवा वि.स.वाळिंबे यांसारखी इ...

शिवछत्रपतींचे आरमार

पुस्तक : शिवछत्रपतींचे आरमार लेखक : गजानन भास्कर मेहेंदळे / संतोष प्र शिंत्रे पाने : १७७   आज जो महाराष्ट्र आहे तो शिवाजी महाराजांमुळे, त्यांच्या दूरदृष्टीमुळे, माणसे पारखण्याच्या आणि जोडण्याच्या कसबेमुळे. त्यांच्या अनेक लढाया गनिमी काव्याची अप्रतिम उदाहरणे आहेत. आणि अशा थोर व्यक्तीच्या कर्तबगारीविषयी, हुशारीविषयी आणि धोरणाविषयी कोणी लिहावे तर मेहेंदळे यांसारख्या इतिहासाच्या मुळापासून अभ्यास केलेल्या इतिहासकाराने. अशा या दोन अफलातून मिश्रणातून तयार झाले आहे ते हे पुस्तक. A diorama showing Maratha naval tactics, on display at the National Museum, New Delhi. | Nomu420 / CC BY-SA 3.0 १५वे - १६वे शतक हा असा काळ होता जेव्हा युरोपिअन सत्ता म्हणजे पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आणि काही प्रमाणात अरब यांचे सागरावर स्वामित्व होते. हिंद महासागरात काही वेगळीपरीस्थिती नव्हती. तेव्हा तर कोकणही स्वराज्यात नव्हते, आदिलशाही आणि नंतर निजामशाहीत होते. अशा कठीण काळात शिवाजी महाराजांनी प्रथम कोकण मुक्त केले. याने काय झाले तर काही किनारे स्वराज्यात आले. यानंतर त्यांनी आपले आरमार उभे करण्यास सुरुवात क...

पडघवली

  'पडघवली' लेखक - गो नी दांडेकर पाने- २२२ प्रकाशन- मौज - आज बाई सारवा, उद्या बाई तारवा - इवलं हातावर हागल्याशिवाय डोळ्यात फुंकरसुद्धा घालायची नाही - माकड गेलं लुटी नि आणल्या दोन मुठी - फाशांचा डाव नि दैवाचा घाव - पायावर पाणी घाल म्हटलं, तर तोरड्या किती तोळ्याच्या... - भित्री भागुबई, चुलीशी बसुबाई - पोरीत पोरगा लोंबडा... - फट म्हणता सन्याशी मरायचा! - नागव्यांच्या गावी पितांबारची पेठ - आपलं घर नि शेणाने भर कोकण म्हटलं की सगळंच निराळं. कोकणचे पाणी असो, माणसं असो किंवा त्यांची शिवराळ वाटणारी भाषा. पुस्तकातील वरील काही कोकणी म्हणींवरून त्याचा प्रत्यय आला असेलच. पण कोकणाची खरी ओळख करून घ्यायची असेल तर 'पडघवली' वाचावे. पडघवली हे एक पुस्तक नाही तर काही वर्षांपूर्वीच्या कोकणाचे चलचित्र आहे. एक एक पान म्हणजे एक एक सीन वाटतो. सुरुवात शिवाजी महाराजांच्या काळातील कोकणात होते. कसे अंजनवेलीच्या किल्लेदाराकडे कारकून असलेल्या केशवभटांनी स्वतः चे रक्त सांडून सिद्दी च्या मुसलमानी चाच्यांची खोड मोडून कोकणातील गणपतीपुळे, गुहागर, अंजनवेल असा परिसर हिंदूंसाठी सुरक्षित केला. बक्षीस म्हणून ...